उदय पाटील राजुरकरांच्या निधनामुळे देगलूर तालुका पोरका झाला.- मा. खा. भास्करराव पाटील खतगावकर

 

 

 

देगलूर प्रतिनिधी,दि.३० :- नांदेड- देगलूर पंचायत समितीचे सभापती कै. उदय पाटील राजूरकर यांच्या निधनामुळे देगलूर तालुका पोरका झाला आहे, देगलूर पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील जनतेसोबत त्यांनी नाळ जोडली होती. प्रत्येकाच्या

 

 

 

 

सुखदुःखात सदैव तत्पर राहणारा नेता माझे मावसभाऊ उदय पाटील राजूरकर यांचे दुःखत निधन झाल्याने मला अतीव दुःख झाले अशी भावना मा.खा. भास्करराव पाटील खतगावकर यांनी व्यक्त केली आहे.

खतगावकर व राजूरकर कुटुंबाचे कौटुंबीक स्नेह संबंध होते, उदयपाटील हे चारित्र्यसंपन्न, २४ तास कार्यकर्त्यांना वेळ देणारे व्यक्तीमत्व होते आणि ते माझे मावसभाऊ होते. स्व. हानमंतराव पाटील राजूरकर, व्यंकटराव पाटील राजूरकर,

 

 

 

 

विट्ठलराव पाटील राजूरकर, केशवराव पाटील राजूरकर व माधवराव पाटील राजूरकर हे स्व.बापूराव पाटील खतगावकर यांचे सखेमावसभाऊ होते पन सर्व राजूरकर भाऊ खतगावकरांना सख्खे भाऊ म्हणूनच प्रेम करत होते.आणि माझे

 

 

 

 

 

प्राथमिक शिक्षण देगलूर येथे स्व. हानमंतराव काका यांच्याकडे झाले. आर्य समाजाची विचाराची बांधीलकी असणारे राजूरकर कुटुंबीयांनी माझ्यासह माझ्या कुटुंबियावरही वर ही खूप प्रेम केल्याची आठवणही खतगावकरांनी व्यक्त केली.

 

 

 

 

 

 

उदय पाटील राजूरकर यांनी करडखेड हानेगाव, खानापूर, मरखेल आदि ठिकाणाहून जिल्हा परिषद सदस्य म्हणून नेतृत्व केले. देगलूर पंचायत समितीचे सभापती व देगलूर कृषी उत्पन्न बाजारसमितीचे सभापती म्हणून दिर्घकाळ राहिले.

 

 

 

 

त्यांच्या राजकीय कार्यकिर्दित जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली. शिक्षणाबरोबरच ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांसाठी त्यांनी निःस्वार्थपने काम केल्याची भावना देगलूर तालुक्यातील

 

 

 

 

जनतेची आहे.त्यांच्या निधनामुळे देगलुर तालुक्यात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे .

 

 

 

ईश्वर यांच्या कुटुंबीयास दुःख सहन करण्याची शक्ती व उदय पाटील राजूरकर यांच्या आत्म्यास शांती मिळो.अश्या प्रतिक्रिया दिल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *