देगलूर प्रतिनिधी,दि.०८ :~कोणतेही राष्ट्र असो त्या देशातील समाज व शासनाला दिशा देन्याचे कार्य संशोधनाद्वारे होत असते त्यासाठी संशोधन कार्य निरंतर चालू राहने आवश्यक आहे. Research या शब्दाचा अर्थच मूळात पुनः पुनः व सखोल अभ्यास करने होय. केंद्र व राज्य शासन व नांदेड विद्यापीठाद्वारे नवीन शैक्षणिक धोरणाची अमलबजावनी सुरू होत असुन विद्यार्थ्यामध्ये संशोधन अभिरुची विकसित करण्याचे कार्य देगलूर महाविद्यालयाने सुरू केले आहे, ही अतिशय महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन स्वा रा ती म विद्यापीठाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ एम डी खंदारे यानी केले आहे.

महाविद्यालय व विद्यापीठाद्वारे केले जानारे संशोधन समाजाला उपयोगी असावे व यात शिक्षक व प्राध्यापक यांची भुमिका महत्वाची आसते असे प्रतिपादन अध्यक्षीय समारोपाद्वारे प्राचार्य डॉ मोहन ख़ताळ याँनी केले. व्यासपीठावर अ व्या शि संस्थेचे कोषाध्यक्ष विलास तोटावार उपप्राचार्य डॉ अनिल चिद्रावार डॉकमाँ अशोक सीध्देवाड उपस्थित होते. संशोधन पद्धती या विषयावर राज्य स्तरीय कार्यशाळेचे आयोजन देगलूर महाविद्यालय देगलूर राज्यशास्त्र विभाग व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
संशोधन पद्धती: प्रवाह व तंत्र या मुख्य विषयवर विद्यापीठातील साधन व्यक्ती डॉ. बाविस्कर सी आर व डॉ प्रमोद लोनारकर यानी संशोधन पद्धतीशी संबंधित प्रवाह , अहवाल लेखन, संशोधन व प्रकाशन नैतिकता आणि तथ्य संकलन व विश्लेषण या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच या कार्यशाळेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. अशोक सिद्धेवाड, डॉ.धोंडीराम धुमाळे व डॉ. संजय गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यशाळेस राज्यातील विविध महाविद्यालयातील व विद्यापीठातील पीएच. डी. संशोधक, प्राध्यापक व विविध शाखेतील पदव्युत्तर वर्गात शिकणारे १३० संशोधक व विद्यार्थी सहभागी झाले होते. याप्रसंगी उप प्राचार्य डॉ अनिल चिद्रावार, ऊपप्राचार्य एम एम चमकुडे , संयोजन सचिव डॉ. आर बी लक्षटे व सह संयोजन सचिव डॉ माधव चोले यांनी परिश्रम केले आहे. या कार्यशाळेस यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ मोहन खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांचे गठण करण्यात आले होते.

