भीमशक्ती सामाजिक संघटनेचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सादर
नांदेड/देगलूर, दि. १७ सप्टेंबर : नांदेड जिल्ह्यातील देगलूर, मुखेड, बिलोली तालुका परिसरात पावसाने थैमान घालून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तूर, सोयाबीन, उडीद, मूग यासह अनेक पिके वाहून गेली, तर घरांची पडझड होऊन शेतकरी व नागरिक अडचणीत आले आहेत.
या पार्श्वभूमीवर भीमशक्ती सामाजिक संघटना नांदेड दक्षिण विभागाच्या वतीने नांदेडचे निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांना निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष शत्रुघन वाघमारे, शिवसेना (उबाटा गट) तालुका अध्यक्ष महेश पाटील, मुखेड तालुका अध्यक्ष आकाश कांबळे, अर्धापूर तालुका अध्यक्ष साहेबराव लोखंडे, भीमशक्तीचे मार्गदर्शक संजय महाराज किरजवळेकर, अॅड. अमोल वाघमारे, रमेश केसरे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांनी या वेळी देगलूर तालुक्यातील तपशेळगाव व लखा गावची परिस्थिती सांगितली. महापुरामुळे गावांचा संपर्क तुटला असून रस्ते उखडून गेले आहेत. संबंधित रस्त्याचे कामासाठी निधी उपलब्ध असूनही गुत्तेदार काम करत नसल्याची माहितीही त्यांनी दिली.
तुपशेळगाव पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे नमूद करण्यात आले. या संदर्भात स्वतंत्र निवेदन द्यावे, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी यांनी भीमशक्तीच्या माध्यमातून केली असल्याचे जिल्हाध्यक्ष शत्रुघन वाघमारे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, लखा गावचे नागरिक नागेश भालेराव हे आज दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी गावाच्या वतीने रस्त्याचे काम तातडीने व्हावे याकरिता अमरण उपोषणास बसले असून याची माहितीही निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहे.
