वझरगा येथील शेतकऱ्यांना जनावरांसाठी चाऱ्याची तीव्र टंचाई – जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन.

 

देगलूर प्रतिनिधी,दि.०१: नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील वझरगा गावातील शेतकऱ्यांनी जनावरांसाठी चाऱ्याच्या तीव्र टंचाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे. सलग दोन दिवसांपासून पाऊस झाल्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यामुळे जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता संपुष्टात आली आहे.

 

 

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, गावातील जनावरांना तातडीने चारा उपलब्ध करून न दिल्यास पशुधनाचे प्राण वाचविणे कठीण होईल. शासनाकडून तात्काळ चारा डेपो सुरू करून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनावर अनेक शेतकऱ्यांनी स्वाक्षऱ्या करून शासनाचे लक्ष वेधले असून, प्रशासनाने सकारात्मक पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.