गुरु रविदास जयंती विशेष

गुरु रविदास जयंती विशेष

गुरु रविदास यांचा जन्म १५ फेब्रुवारी १३९८ रोजी उत्तर प्रदेशातील काशी जवळ मांडूर येथे झाला. सूर्या सारखा तेजस्वी मुखचंद्रमा असलेल्या बालकाचा जन्म रविवारी झाला. सूर्य ज्याप्रमाणे अंधकार दूर सारून साऱ्या जगाला प्रकाश देतो त्याप्रमाणे या बालकाचे कर्तुत्व असावे या उद्देशाने या बालकाचे नाव रविदास असे ठेवण्यात आले

 

रविदास आपल्या जन्मापासूनच बुद्धिमान,चातुर्य,जिद्द, चिकाटी, कर्तव्यदक्ष व ज्ञान ग्रहण करण्याची आवड आदी गुणामुळे त्यांनी एका स्वामीच्या आश्रमात आठ वर्षापासून संस्कृतचा अभ्यास केला.

 

रविदासांची जात आश्रमात इतरांना माहित होताच त्यांना जातीवादाचे चटके बसले व त्यांना आश्रम सोडावे लागले. परंतु ज्ञानाची भूक त्यांना अस्वस्थ बसू देत नव्हती त्यांनी कठोर परिश्रमाने संस्कृतचा अभ्यास करून प्रभुत्व मिळवले तसेच पंजाबी उर्दू गुजराती हिंदी या भाषेची ही ज्ञान संपादन केले.

 

गुरु रविदास यांनी समाज प्रबोधन करून समाजाला योग्य व उत्साही जीवन जगण्यासाठी त्यांनी मोलाचे असे मार्ग दाखविले. समाजातील अनेक प्रकारच्या अनिष्ट रूढी परंपरा दूर करून तात्कालीन समाजाला रचनात्मक कार्य करण्यासाठी उत्साही केले समाज म्हणजे सामाजिक संबंधांचे मूळ होय. समाजातील सामाजिक संबंध टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न केले.

 

माणूस हा समाजशील प्राणी आहे. तो नेहमी समाजाच्या सहवासात राहतो.समाजात वावरत असताना समाजातील अनेक घटकांना आदर्श जीवनमूल्यचा स्वीकार करून आपले जीवन सफल जगावे असे त्यांचे म्हणणे साध्या भाषेत त जीवन मूल्य समजावून सांगण्याचा प्रयत्न गुरु रविदासांनी

 

केला. या भूतलावर सर्व मानव समान आहेत. कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही व्यक्ती नावाने ओळखल्या जात नसून ते आपल्या कर्माने ओळखल्या जातात गुरु रविदासांनी मानवतेलाच श्रेष्ठ मानले होते. दिन दुबळ्यांची सेवा करणे त्यांच्या अडचणी सोडविणे हे कर्म मानव समाजाचे आसल्याचे गुरु रविदासांनी सांगितले आहे. या भूतलावर स्त्री आणि पुरुष या दोनच जाती अस्तित्वात आहेत. त्या व्यतिरिक्त कोणत्या च जाती नाहीत. त्यामुळे धर्मभेद करणे गैर आहे. असे गुरु रविदासांचे म्हणणे होते.

 

गुरु रविदासांनी समाजाला मानवतेचा व ज्ञानाचा संदेश दिला. समाजातील लोकांच्या मनपटलावर बिंबवण्याचे काम केले. समाजातील तळागळातील मानवाला एक सूत्रे आणण्याचा प्रयत्न केला. या पृथ्वीवर सर्व मानव जात समान आहे जोपर्यंत आपण समानता धारण करणार नाही तोपर्यंत या पृथ्वीवर शांतता सुबोधता व मानवता राहणार नाही. असे त्यांचे मान्य होते.

 

अशा या गुरु रविदास यांचे कार्य म्हणजे संतश्रेष्ठ व विज्ञानवादी कार्य होय. गुरु रविदास यांचे अनेक महान शिष्य होऊन गेले. त्यात संत मीराबाई, सदनपीर,रीना सांगा, गरीब दास, कल्याण दास, हरिदास असे असंख्य कितीतरी महान संत रविदासांचे शिष्यत्व पत्करले होते. अशा प्रकारे गुरु रविदास यांना संत तार्‍यातील ध्रुवतारा म्हणून पण ओळखल्या जातो. त्यांच्या दोह्यातून त्यांच्या पदातून रचना खूप उच्च कोटीची आहे असे समजते.

मन चंगा तो कटोती मे गंगा

चाम के हम भी, चाम के तुम भी
चाम का है जग सारा…
चाम बिगर, कोण है जीव
कह रविदास चमारा…

ऐसा चाहू राज मै,
जहा मिले सबन को अन्न
छोट बडो सब सम बसे
रविदास रहे प्रसन्न…

जन्म जात मत पुछिये,
का जात आस पात
रविदास पुत सब प्रभू के
कोऊ नही जात कुजात…

मंदिर मजीद दोउ एक है
इनमह अंतर नाही
रविदास राम रहेमान का
झगडाऊ कोउ नाही…

चंद्रसेन माणिक गंगासागरे घुंगराळा
अखिल भारतीय गुरू रविदास समता परिषद युवा विभागीय प्रवक्ता
मो.9561718130