बिचकुंदा प्रतिनिधी, दि. ०१ : पाऊस पडल्याने सोयाबीन पुर्णपणे फसलाय त्यामुळे शेतकरी दिशाहीन अवस्थेत दिसतोय गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मदनूर, बिचकुंदा आणि जुक्कल. झोनमधील शेतकरी सोयाबीनची जास्त लागवड करत असतात आणि गुलाब चक्रीवादळामुळे सोयाबीनचे पीक पाण्यामध्ये बुडाले आहे. सोया. गया. इतकी गुंतवणूक केलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. दरवर्षीप्रमाणेच हाताशी आलेले पीक पाण्याखाली गेल्याने शेतकरी दुविधेत आहेत. नुकसान झालेल्या पिकाला सरकारने तात्काळ नुकसानभरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.