नांदेड प्रतिनिधी, दि.३१ :- १९ आणि २० वी अमरनाथ, वैष्णोदेवी,अमृतसर यात्रा तसेच १० वी चारोधाम यात्रा सुखरूपपणे पार पडल्याबद्दल दरवर्षीप्रमाणे आज रविवार दि. ३१ जुलै २०२२ रोजी दुपारी ११.३० ते ३ वाजेपर्यंत स्वामी समर्थ मंदिर सोमेश कॉलनी नांदेड येथे अमरनाथ यात्री संघ नांदेड तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भक्तांनी भोजन प्रसाद ग्रहण करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे.

अमरनाथ यात्रेमध्ये यावर्षी ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले होते.
खडतर असलेली अमरनाथ वैष्णोदेवी यात्रा तसेच चारोधाम यात्रा सुखरूप पार पडावी यासाठी चार महिने चालण्याची व प्राणायामची पूर्वतयारी फक्त नांदेड मध्येच दिलीप ठाकूर हे करून घेतात . त्याचा फायदा यात्रेकरूंना झाल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही सर्वजण तंदुरुस्त आहेत. नांदेडच्या अमरनाथच्या दोन्ही जत्थ्यातील एकूण २०५ यात्रेकरूंचे तसेच चारोधाम से ४० यात्रेकरूंचे व्यवस्थित दर्शन झाल्याने सर्वजण आनंदी आहेत.
त्यामुळे दिलीप ठाकूर यांच्यासह सतीश सुगनचंदजी शर्मा,सौ सुषमा आणि नरसिंह ठाकूर,सौ.उज्वला आणि केशवराव हळदेकर, सौ.संध्या आणि धोंडोपंत पोपशेटवार,सौ.वर्षा आणि ओमकार बंगरवार,सौ.सूर्यकांता आणि डाॅ. शिवाजीराव भोसले,सौ.संध्या और सुधीर विष्णुपुरीकर,महेश शंखतीर्थकर एक शिवभक्त यांनी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. पाऊस पडला तरी महाप्रसाद वेळेवर सुरू होणार असल्यामुळे जास्तीत जास्त हिंदू भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अमरनाथ यात्री संघातर्फे करण्यात आले आहे.

