धर्माबाद प्रतिनिधी:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त (१४ एप्रिल) धर्माबाद येथे शिवसेना (शिंदे गट)च्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत शुद्ध पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. पानसरे चौक येथे आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विधान परिषदेचे गटनेते ना. हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव बोनढाकर, आमदार बाबुराव कोहळीकर, लोकसभा संपर्क प्रमुख रमाकांत मडवी आणि जिल्हा प्रमुख गंगाधर बडूरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. धर्माबाद तालुका प्रमुख आकाश भाऊ रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व बालकांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळाला. या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिगांबर पा. जगदंबे, शिवशंकर सुरकूटवार, पी. जी. कोटूरवार, दीपक झाडे, बळीराम कांबळे, अमीर पठाण, साईनाथ मुरारी आदींनी परिश्रम घेतले.
