देगलूर महाविद्यालयात कविसंमेलन रंगले
देगलूर प्रतिनिधी,दि.२६:- लोभस प्रेमाची अदा आपल्या प्रियकराला दिसावी असे प्रेयसीला नेहमीच वाटत असते तीची अदा पाहण्यासाठी प्रियकर ही धडपडतो अशा भावनांची गझल कवियत्री रोहिणी पांडे यांनी सादर करून कविसंमेलनात तरूणाई स रिझविले महाराष्ट्र शासन भाषा संचालनालय मुंबई यांच्या निदर्शनानुसार
भाषा संवर्धन पंधरवडा च्या निमित्ताने देगलूर महाविद्यालयातील मराठी विभागाकडून कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

या कविसंमेलनाच्या अध्यक्ष स्थानी डाॅ.मिलींद शिकारे होते कविसंमेलनात कवी लक्ष्मण मलगिलवार यांनी “तुझ्या शेताला लागून” ही कविता सादर करीत सहचारीणीचे शेजारी असलेल्या शेताचे बहरलेले वर्णन करणारी कविता दाद घेऊन गेली.
श्रीनिवास मस्के यांनी बदलून गेलं या सारं शाळेची सुटली या दोरं या विडंबनाची कविता सादर करून विद्यार्थ्यांना खळाळून हसविले सखी तुझ्या पावसात चिंब भिजू दे काळजात लागलेली आग विझू दे “सखी तुझ्यासंग पावसात ही प्रितीने ओतप्रोत भारलेली कविता बालाजी पेटेकर यांनी सादर करून तरूणाई च्या मनाला घायाळ केले कवी नरेंद्र घोंगडे ;ग्रामीण कवी माधव मोखेडे यांच्या गेय कवितेने कविसंमेलनात वेगळी किनार दिली.
तर पांडूरंग पुठ्ठेवाड यांनी “तु” या कवितेतून सुख दुःखात ही आपण साथ सोडणार नाही हेच आश्वासित केले सख्या साठवुन घेतलय तुला मी मनात अजुन हि तुझाच गंध दरवळतोय माझ्या श्वासात या आशयाची दिर्घ कविता कवियत्री अंजली मुनेश्वर यांनी सादर केली कधी कधी तुझ्या पत्रांचा गठ्ठा घेऊन वाचू लागतो तेव्हा मनातली पाखरं झाडावरून उडवीत तशी उडू लागतात कवी प्रा महेश कुडलीकर यांनी हल्लीच्या जमान्यात पत्र दुरापास्त झाली आहे आपल्या जमान्यातील भावना व्यक्त करणारी “पत्रं” कविता सादर करून दाद मिळवली.
एकाहून एक कविता सादरीकरणाने कविसंमेलनात रंगत भरली. कविसंमेलनाच्या प्रारंभी दिपप्रज्वलन झाले प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डाॅ विठ्ठल जंबाले यांनी केले यानतंर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहन खताळ यांनी मार्गदर्शन केले यावेळी मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात राज्यशास्त्र विभागाकडून मतदान दिनाचे औचित्य साधून भित्ति पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच शपथ घेण्यात आली.
शेवटी अध्यक्षीय समारोप “गोधडी” कवीता वाचन करून डाॅ.मिलींद शिकारे यांनी केला. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन कवी श्रीनिवास मस्के यांनी केले
कविसंमेलनास अ व्या शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नारायणराव मैलागिरे
सहसचिव सूर्यकांतराव नारलावार कोषाध्यक्ष विलास शेठ तोटावार कार्यकारिणी सदस्य रविंद्र अप्पा द्याडे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहन खताळ उपप्राचार्य डाॅ.अनिल चिद्रावार कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एम एम चमकुडे -पटेल पर्यवेक्षक संग्राम पाटील डाॅ सर्जेराव रणखांब डाॅ राजेश्वर दुडूकनाळे डाॅ चंद्रशेखर बाकेवाड प्रा.डाॅ संजय पाटील डाॅ रत्नाकर लक्षट्टे डाॅ.माधव चोले आदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

