मित्र…

 

 

 

कालचा दिवस फ्रेंडशिप डे म्हणून आपण साजरा केला. ही एक नवीन संस्कृती आपण स्वीकारतो. फ्रेंडशिप डे ,मदर डे, फादर डे ,व्हॅलेंटाईन डे आता आपल्या संस्कृतीने स्वीकारले आहे.जे जे चांगले असेल ते ते स्वीकारायचं असतं त्यात काहीच

 

 

 

 

हरकत घेण्यासारखे नाही .पूर्वी मदर डे साजरा करण्यात येत नव्हता त्या काळात ही आई वर जीवापाड प्रेम करणारी पिढी होतीच .फादर डे साजरा करण्यापेक्षा वडिलांच्या शब्दाला आयुष्यभर मान देणारी पिढीही आम्ही पाहिली आहे.


फ्रेंडशिपच्या दिवसानिमित्त विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. मोठ मोठे तत्त्वज्ञानाचे संदेश व्हाट्सअप च्या माध्यमातून फिरत राहिले आणि मग या व्हाट्सअप मेसेजला अजून रंजक बनवण्यासाठी हिंदी फिल्म गीतांचा सहारा देण्यात आला

 

 

 

 

 

मैत्री म्हणजे नेमके काय लहानपणी एकत्र शाळेत किंवा मग एका वर्गात एकाच वयातील मुलं शिकतात त्यांना बालमित्र म्हणून गणल्या जाते. पुढील आयुष्यात महाविद्यालयीन जीवनात एकत्र शिकलेल्या विद्यार्थ्यांना तरुण वयातील मित्र समजले

 

 

 

 

 

जाते. एकाच कॉलनीत एकाच गावातील समवयस्क मुलांनाही मित्र म्हणून समजले जाते .ती मुलं आणि मुलीही थोड्याफार प्रमाणात तसेच मित्र मानतात. पुढील खरतर आयुष्यात एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती एकमेकांना मित्र मानतात. पदक प्रतिष्ठा श्रीमंती वरूनही अनेकदा मैत्री होते.

 

 

 

 

 

 

व .पु .काळेंनी मैत्रीविषयी एके ठिकाणी असं म्हटलं आहे की अनेक वर्षे एकत्र राहणारी व्यक्ती एकमेकांना चांगली ओळखून शकतात पण ते एकमेकांचे मित्र बनतातच असे नाही.

 

 

 

 

 

एका शाळेत किंवा एका महाविद्यालयात आपण एकत्र शिकलो तरी आपण चांगले मित्र बनतो असे नाही .पुढील काळात आपण एकाच क्षेत्रात काम करत असलो तरी एकमेकांचे सहकारी बनु शकतो मित्र नाही. एका गावात आपण राहत असलो तरी गावकरी म्हणून आपण एकमेकांशी सौदाहर्याने वागू शकतो.पण मित्र आहोत असे नाही.

 

 

 

 

 

 

मैत्रीची चर्चा बरीच जुनी अगदी पुराण काळापासून मैत्रीचे नातं मानलं गेलं .एकत्र खेळण्यासाठी झालेली मैत्री पुढे महाविद्यालयीन जीवनात अभ्यासाच्या कारणामुळे दुरावते. महाविद्यालयीन किंवा तरुण वयातील मैत्री पुढील आयुष्यातील यश अपयशावरच अवलंबून असते .गावातील मैत्री गाव बदलले की बदलून जाते.

 

 

 

 

 

 

मग हे सारं मैत्रीचं मृगजल आहे की काय असं वाटतं आणि मैत्रीचे नाते हे सत्य नसून एखाद्या लेखकाची कल्पना आहे की काय असं वाटून जातं.
जीवनातील शाश्वत तत्वांची तुम्हाला जाणीव होऊ लागली ,सत्य, चारित्र संपन्नता, कष्टाळूपणा ,प्रामाणिकपणा, व्यवहारातील सचोटी, आई-वडिलांशी सेवाभाव,

 

 

 

 

 

 

कर्तव्यनिष्ठा यांची जोड जीवनाला तुम्ही देऊ लागलात. तेव्हा एकमेकांचे विचार जुळणाऱ्या व्यक्ती एकत्र आल्या की मग शिक्षण, पद, प्रतिष्ठा, श्रीमंती, यश, अपयश या बेगडी बंधनातून तुमची मैत्री मुक्त होते अशा मित्रांमध्ये एकमेकांविषयी प्रेम तसेच आदरभाव नाही निर्माण होतो ‌.

 

 

 

 

 

 

खरंच निखळ प्रेम करणारा आपल्या विचाराचा प्रेमळ मित्र मिळणं दुर्मिळच. ईश्वर कृपे शिवाय असे मित्र मिळूच शकत नाहीत. आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो असेच प्रेमळ जीवनातील विचार एकमेकांशी जुळणारे मित्र मला लाभले. त्यामुळेच की काय मी जीवनाचा मनमुराद आनंद घेऊ शकतो.

 

 

मी एक आनंदयात्री
@राजू पाटील लच्छनकर
६३०४८७३७२४ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *