‘किसान सन्मान’च्या लाभार्थ्यांनी ७ सप्टेंबरपूर्वी ई- केवायसी पूर्ण करावी – जिल्हाधिकारी पवनीत कौर

अमरावती, दि. ०३ : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत सर्व पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक आहे.ई- केवासी करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे  संबंधितांनी ती दि.७ सप्टेंबरपूर्वी  पूर्ण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

 मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखालील बैठकीत  ई-केवायसी पूर्ण करण्यास दि. ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांनी ही प्रक्रीया पूर्ण केली नाही त्यांना पुढील हप्ताचा लाभ मिळणार नाही. ई-केवासी मिळण्यासाठी  सीएससी केंद्राशी संपर्क साधून, तसेच pmkisan.gov.in या संकेतस्थळावर फार्मर्स कॉर्नर- ई-केवायसी न्यू  हा पर्याय निवडून ओटीपीव्दारे नोंद  करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी केले.

 

बँक खात्यासोबत आधार संलग्न करण्यासाठी लाभार्थ्यांनी बँकेशी संपर्क साधून  आधार व बँक खाते जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. त्याचप्रमाणे ई-केवासी करतांना कुठलीही अडचण आल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील कंट्रोलरूमशी (०७२१ -२६६२०२५) संपर्क साधावा.

                सर्व  तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी ई-केवासी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करावी.  लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया दि. ७ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावी असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी  केले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *